अर्ज कसा करायचा?
- जर अंत्योदय कार्डधारकांकडे आयुष्मान कार्ड नसेल तर तुम्ही संबंधित विभागात जाऊन अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकतात.
- पात्र लाभार्थ्यांना कार्ड मिळाल्यानंतर जनसेवा केंद्र, सामुदायिक आरोग्य केंद्र, आयुष्मान पॅनेलशी जोडलेले खाजगी रुग्णालय किंवा जिल्हा रुग्णालयात अंत्योदय शिधापत्रिका दाखवून कुटुंबातील सर्व सदस्यांसाठी आयुष्मान कार्ड बनवता येईल.
- सध्या सरकारकडून नवीन आयुष्मान कार्ड बनवले जात नसून ज्या लाभार्थ्यांची नावे या योजनेत आधीच समाविष्ट आहेत, त्यांचीच कार्ड बनवली जात आहेत.
- अंत्योदय कार्डधारकांना आरोग्याशी संबंधित कोणतीही समस्या उद्भवल्यास उपचारासाठी भटकावे लागू नये, अशी शासनाचे प्रयत्न आहेत.
- यासाठी शासन स्तरावरून देखल जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.
अंत्योदय कार्ड कोणाला मिळते?
- दारिद्र्यरेषेखालील (बीपीएल) कुटुंबांना अंत्योदय शिधापत्रिका (रेशन कार्ड) दिले जाते.
- या कार्डद्वारे लाभार्थ्याला दर महिन्याला स्वस्त दरात खाद्यपदार्थाचा लाभ मिळतो.
- कार्डधारकांना एकूण ३५ किलो गहू व तांदूळ दिले जाते.
- यासाठी गहू २ रुपये प्रति किलो तर तांदूळ ३ रुपये किलो मोजावे लागतात.