पीएम किसानचे या शेतकऱ्यांना मिळणार 6000 ऐवजी 8000 रुपये

PM Kisan : नमस्कार मित्रांनो, केंद्र सरकार शेतकरी सन्मान निधीची रक्कम 5 राज्यांतील विधानसभा निवडणुकीपूर्वी वाढवण्याची घोषणा करू शकते. वर्षाला जवळपास 6 हजार रुपये सध्या एका शेतकरी कुटुंबाला सरकार कडून मिळत असतात, परंतु आता या राज्यातील शेतकऱ्यांना 6 हजारा ऐवजी वर्षाला 8 हजार रुपये देण्याची केंद्र सरकार तयारी करत असताना दिसत आहे.

यामुळे जवळ जवळ साडेआठ कोटी कुटुंबांना या सरकारच्या निर्णयचा फायदा होईल असे सांगण्यात येत आहे.केंद्रातील सूत्राच्या माहितीनुसार, याच महिन्यामध्ये याचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत आणला जाण्याची दाट शक्यता आहे. याचदरम्यान, निवडणूक आयोगा कडून जरी आचारसंहिता जाहीर करण्यात आली तरीही केंद्र सरकार मंत्रिमंडळमध्ये याबाबत प्रस्ताव मंजूर करून निवडणूक संपल्यानंतर या निर्णयाची घोषणा करू शकते.

 

11 कोटी लोकांना मिळत होती रक्कम

24 फेब्रुवारी 2019 पासून केंद्र सरकार कडून शेतकरी सन्मान निधी योजना लागू करण्यात आली होती.तीन हप्त्यांमध्ये या योजनेंच्या अंतर्गत शेतकऱ्यांना सरकार कडून जवळ जवळ 6 हजार रुपये वर्षाला मिळत असतात, सन 2019-20 मध्ये जवळपास 9 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 6 हजार रुपये जमा करण्यात आले होते, सन 2020-21 मध्ये 10 कोटी, तर सन 2021-22 मध्ये जवळपास 11 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 6 हजार रुपये केंद्र सरकार कडून ट्रान्सफर करण्यात आले होते.

केंद्र सरकाराने नंतर आढावा घेतला असता पात्र लाभार्थींची संख्या ही जवळ जवळ 10 कोटी 60 लाख इतकी सरकारला दिसली. त्यानंतर पुन्हा एकदा लाभार्थींचा आढावा केंद्र सरकारने घेतला असता केवळ 8 कोटी 51 लाख लाभार्थीच खरे असल्याचे निदर्शनास आले. म्हणजेच याचा अर्थ असा होतो कि, जवळ जवळ अडीच कोटी लाभार्थी बनावट असल्याचे सरकारला आढळून आले.केंद्र सरकारचे आता म्हणणे आहे की, 2 हजार रुपये रक्कम वाढवल्याने केंद्राकडून देण्यात येणारी एकूण रक्कमेमध्ये कुठल्याही प्रकारची वाढ होणार नाही.

 

कुठल्या राज्यात किती शेतकरी कुटुंबे

  • यूपीमध्ये जवळ जवळ 1 कोटी 86 लाख शेतकरी कुटुंबे आहेत
  • मध्यप्रदेश मध्ये जवळ जवळ 76 लाख 43 हजार शेतकरी कुटुंबे आहेत.
  • बिहार मध्ये जवळपास 75 लाख 66 हजार शेतकरी कुटुंबे आहेत.
  • राजस्थान मध्ये जवळपास 56 लाख 88 हजार शेतकरी कुटुंबे आहेत.
  • गुजरात मध्ये जवळ जवळ 45 लाख 18 हजार शेतकरी कुटुंबे आहेत.
  • छत्तीसगड मध्ये जवळपास 20 लाख 24 हजार शेतकरी कुटुंबे आहेत.
  • हरियाणा मध्ये जवळ जवळ 15 लाख 37 हजार शेतकरी कुटुंबे आहेत.
  • झारखंड मध्ये जवळपास 13 लाख 2 हजार शेतकरी कुटुंबे आहेत.

Leave a Comment